पेट्रोल संपले तर १०वी-१२वी लेखी परीक्षा- मराठी निबंध

१०वी १२वी लेखी परीक्षा मराठी निबंध

पेट्रोल संपले तर

मोटारसायकल वर बसून गावी जात असतांना अचानक जर  मोटारसायकलच्या टाकीतील पेट्रोल संपले तर आपण काय करतो. एकतर रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्याना पेट्रोल मागतो किंवा गाडी लोटत लोटत पेट्रोल पंपापर्यंत आणतो.आणि हो कल्पना करा कि आपल्या पृथ्वी वरील पेट्रोलच जर संपले तर काय होईल.कोठून आले हे पेट्रोल.आम्ही त्याचा वापर कसा करत आहोत.आणि पेट्रोल संपण्या अगोदर पेट्रोल ला पर्यायी इंधन आम्ही शोधायला हवे का

पृथ्वीच्या जादुई पोतडी मध्ये साठवलेले खनिज तेल मानवाणे उकरून काढले. ते वापरले आणि माणूस हरकुन गेला. पूर्वी पाई चालत चालत माणूस कित्येक मैलांचा प्रवास करत असे. आता तर विमानात हेच खनिज तेल भरून देशोदेशीचा प्रवास करू लागला. सकाळी अमेरिकेत, दुपारी जपानला तर सायंकाळी भारतात  अशी  मानवी प्रवासाची एक स्पर्धाच सुरू झाली. म्हणजेच माणूस सुसाट वेगाने धावू लागला आहे.

आखाती देशांमध्ये खनिज तेलाचा साठा आहे यामध्ये पेट्रोल आणि डिझेल हे मुख्य साठे होत. या साठ्यांना आपण तेलाच्या विहिरी म्हणतो. पेट्रोल ही मानवाला मिळालेली  देणगीच आहे. मानवाणे  स्वतःच्या सुखासाठी पेट्रोल वापरणे सुरू केले मात्र माणूस हा प्राणी एक नंबरचा अप्पलपोटा, स्वार्थी, लबाड आणि भांडकुदळ आहे म्हणूनच या खनिज तेलावरून जागतिक युद्ध सुद्धा पेटू शकते अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. काही वर्षां अगोदर सद्दाम हुसेनने तर तेलाच्या विहिरी  पेटवून दिल्याच्या आपणास ज्ञात आहेच.

आमचे संपूर्ण जीवन पेट्रोल मय झालेले आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. कारण सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री अंथरूणावर झोपेपर्यंत आम्ही पेट्रोल आणि पेट्रोल मुळे तयार झालेल्या वस्तू यांच्याच सानिध्यात जास्तीत जास्त वेळ घालवतो. पेट्रोल  च्या मदतीने तयार झालेले प्लास्टिक हे तर आमच्या जीवनाचे अविभाज्य घटक बनलेले आहे. घरासमोर असलेली दोन चाकीचारचाकी वाहन हे खनिज तेलावर म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलवर चालतात.

जर हा पेट्रोलचा साठा संपला तर आमचे संपूर्ण दळणवळण कोलमडेल. मोटर सायकल, कारमोटरी, बसेस, ट्रक , ट्रॅक्टरविमान ही दळणवळनाची साधणे जागच्या जागीच थांबून राहतील. अगदी एखाद्या पुतळ्या प्रमाणे. आणि मग मानवी प्रवास हा अश्मयुगातील मानवाप्रमाणे संथ आणि खडतर होईल. पुन्हा बैलगाडी, घोडागाडी चालवावी लागेल, सायकल वर पायडल मारावे लागेल, संपूर्ण जीवन संथ आणि अडचणीचे होईल पूर्ण  व्यापार धोक्यात येईल. शेतकर्‍याने शेतात पिकवलेला माल  बाजारपेठेत विक्रीसाठी अडचणीचे होईल, महागाई आभाळाला टेकेल, परदेशात जाणाऱ्या वस्तू आणि फळ पदार्थ आम्हाला वेळेवर पाठवता येणार नाहीत. म्हणजेच परकीय चलन बुडेल आमच्या देशाच्या तिजोरीवर ताण पडेल आमचे संपूर्ण जीवन खडतर होईल.

पण आम्हाला यातून शिकायला सुद्धा मिळेल. माणूस निसर्गाच्या खूप जवळ जाईल खनिज तेलाच्या वापरातून भरधाव धावणाऱ्या गाड्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे होणारे प्रदूषण कमी होईल. माणूस पृथ्वीवरील नवीन तेलाचे साठे शोधेल आणि त्याला मिळालेच नाही तर तो खनिज तेलाला पर्यायी इंधन शोधून काढेल तसा त्याने भविष्याच्या दृष्टिकोनातून विजेवर चालणाऱ्या वाहनांचा शोध लावलेला आहेच ! म्हणजेच माणसाला याची जाणीव आहे की, कधीतरी पेट्रोल सारख्या तेलाचे साठे संपणार आहेत.

त्याच  बरोबर मानवाने सौर ऊर्जा, अणूउर्जा, लाटांपासून मिळणारी ऊर्जा, पवन ऊर्जा यांचा शोध घेणे सुरू केलेले आहे म्हणतात ना 'गरज ही शोधाची जननी आहे'. मानवाने पृथ्वीपासून चंद्र, मंगळा पर्यंत आपल्या नवनवीन शोधांचे ठसे उमटवलेले आहेत. पेट्रोल संपले तरी निसर्गात मिळणाऱ्या बाबींचा वापर करून माणूस आपले जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल असे मला वाटते.

Post a Comment

0 Comments