स्वाध्याय उपक्रम.महाराष्ट्रातील इयत्ता १ ली ते १० वी च्या विध्यार्थ्यांना पुढील वर्गातील प्रवेशासाठी महत्वपूर्ण

 

ध्याच्या कोविड 19 च्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा पुढील वर्गातील प्रवेश व ईतर मूल्यमापनासाठी  स्वाध्याय उपक्रमातील विद्यार्थ्यांचा सहभाग याचा- मूल्यमापनाचे साधन म्हणून उपयोग होऊ शकतो. याची सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांना जाणीव होणे अपेक्षित आहे. एकदा नोंदणी केल्यावर पुन्हा पुन्हा नोंदणीची आवश्यकता नाही.

 

स्वाध्याय उपक्रमामध्ये आत्ताच नोंदणीसाठी व स्वाध्याय सोडविण्यासाठी येथे क्लिक करा.

 

स्वाध्याय उपक्रमामध्ये सहभाग कसा घ्यावा ह्याचा डेमो व्हीडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून 'स्वाध्याय' (डिजिटल होम असेसमेंट योजना) उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या माध्यमातून पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व इयत्तांमधील विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असणाऱ्या मोबाइलवर 'क्विझ' (प्रश्नमंजूषा) पाठवण्यात येईल, तर त्याच्या उपयोगातून शिक्षक, विद्यार्थी आणि पालक विद्यार्थ्यांच्या सद्यस्थितीबद्दल नियमित माहिती मिळवू शकतील.

 

कोविड १९- करोनामुळे शाळा काही महिन्यांपासून बंद असल्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. एका स्मार्ट फोनद्वारे १०० विद्यार्थी व्यग्र राहू शकतात. ज्या विद्यार्थ्यांकडे म्हणजेच त्यांच्या पालकांकडे 'स्मार्ट फोन' नाहीत, तेही या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. हा 'स्वाध्याय' चा सर्वांत मोठा फायदा आहे.

 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) व लीडरशिप फॉर इक्विटी यांच्या वतीने स्वाध्याय उपक्रम सुरू केला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उपक्रमाचे उद्घाटन करून, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शालेय शिक्षण विभागाचे कार्यक्रम व उपक्रम पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना केले. अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, 'एससीईआरटी'चे संचालक डॉ. दिनकर पाटील, विकास गरड आदी उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढविण्यावर भर देण्यात येईल. प्रारंभी, मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमासाठी मराठी आणि गणिताचे विषय सुरू झाले असून, येत्या काही दिवसांत उर्दू माध्यमही सुरू केले जाईल असे सांगितले आहे . राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद केलेल्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढीसाठी स्वाध्याय हा उपक्रम फायद्याचा ठरणार आहे, असे शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलेले आहे .

 

स्वाध्याय उपक्रम कोणासाठी?

 - पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी

 - माध्यम : मराठी / सेमी-इंग्रजी

 - विषय : मराठी आणि गणित

 - कधी : दर शनिवारी

 - स्वाध्यायातील प्रश्न सोडवण्यासाठी वेळ : एक आठवडा

 - दर शनिवारी विद्यार्थ्यांना गणितातील १० आणि भाषेतील १० प्रश्न सरावासाठी पाठवून त्यांना सरावासाठी प्रोत्साहित केले जाईल

 - विद्यार्थ्यांकडे सरावासाठी एक आठवड्याचा वेळ असेल.

 - विद्यार्थिनीने / विद्यार्थ्याने सर्व प्रश्नांची उत्तरे देताच लगेचच तिची / त्याची कामगिरी त्यांच्यासोबत शेअर केली जाईल.

 - अशा प्रकारे विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या कामगिरीचे स्वत: च मूल्यांकन करू शकतील.

 - विद्यार्थ्यांना सरावासाठी आणि ज्या भागासाठी मदत हवी आहे, त्यासाठी उपचारात्मक साहित्य पाठवले जाईल.

 - संकलित केलेल्या माहितीद्वारे राज्य, जिल्हा, केंद्र आणि शाळा स्तरावरील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि कामगिरी समजत राहील.

 - शिक्षकांनाही त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांची कामगिरी प्रदान केली जाईल. परिणामी, शिक्षक अधिक चांगल्या प्रकारे उपाययोजना करू शकतील.

 - या उपक्रमाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एका स्मार्टफोनद्वारे १०० विद्यार्थी व्यस्त राहू शकतात. ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, तेदेखील सहभागी होऊ शकतात.

 - शिक्षक, स्वयंसेवक, एसएमसी / एसएमडीसी सदस्य, गावातील किंवा वस्तीपातळीवरील स्थानिक तरुण स्वतःचे स्मार्टफोन वापरून एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊ शकतात.

Post a Comment

1 Comments