आळाशी-कविता - इयत्ता 8 वी मराठी बालभारती - पृष्ठ क्र 70, कविता व MCQ स्वाध्याय
आळाशी- कविता - कवी हनुमंत चांदगुडे - या कवितेचे वाचन करून खालील MCQ स्वाध्याय सोडवल्यास आपल्याला हा कविता कितपत समजली हे कळेल तसेच आपली बरोबर आलेली उत्तरे आपणास समजतील आणि चुकलेल्या उत्तरांऐवजी बरोबर उत्तरे कोणती हे सुद्धा आपणास कळेल,
कवितेचा अर्थ-
शेतकरी रात्रंदिवस शेतात राबत असतो अनवाणी पायाने उन्हाळ्यातले काम करत राहतो स्वतः उपाशी पोटी राहुन दुसऱ्यांचे पोट भरण्यासाठी तो रात्रंदिवस काम करतो इतके परिश्रम करताना बघून नभाला देखील अश्रू येतात आणि पावसाच्या रुपाने तो शेतकऱ्याच्या
परिश्रमाचे फळ देतो त्याच्या कपाळावरील घामाचे पाझर जणू नभाला फुटतात म्हणून त्याचे अत्यंत परिश्रम बघून सर्वांनी शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञ राहावे असे कविला म्हणायचे आहे कारण नभाला पण पाझर यावे असे त्याचे कष्ट आहेत शेतकरी भरघोस पीक यावे यासाठी रात्रंदिवस चिखलपाण्यात राबत राहतो त्यामधून पिकणाऱ्या अन्नधान्यावर जगाचे पालनपोषण होते अन्न हे आपल्या महत्वाच्या गरजांपैकी एक महत्वपूर्ण गरज आहे आपल्याला जीवंत राहण्यासाठी जशी पाण्याची गरज असते तशीच अन्नाची गरज असते आणि ते अन्न आपल्याला शेतकऱ्यांमुळे मिळते स्वतः उपाशी पोटी राहून तो शेतात राबत असतो त्याच्या पिकाला जेव्हा हवी तेवढी किंमत नाही तेव्हा तो खूप हताश होतो पण आपल्या परंपरेला न विसरता पुन्हा कर्ज काढून शेती करतो त्याच्या प्रत्येक त्यागामागे जगातील सर्व लोक जेवतात आपल पोट भरतात आणि म्हणूनच शेतकरी संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे दु:ख मात्र एव्हडेच आहे कि तो राबराब राबतो आणि आणि तोच स्वतः उपाशी असतो
आपला हा स्वाध्याय सोडवून संपल्यावर शेवटी असलेल्या Submit निळ्या रंगाच्या बटनला क्लिक करा, पुढे एक नवीन पेज दिसेल येथे आपल्याला किती गुण मिळालेत,आपले किती प्रश्न चुकले, त्या चुकलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे कोणती आहेत हे पाहण्यासाठी View Score अशा निळ्या रंगाच्या बटनला क्लिक करा, अशाप्रकारे आपण हा स्वाध्याय पूर्ण कराल- त्यानंतरचा दुसरा स्वाध्याय सोडवा व मित्रांना सुद्धा सराव करण्यास सांगा Best Of Luck
आमच्या टेलिग्राम channel ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या Whats app ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments